Tuesday, July 7, 2026
Homeभंडाराईव्हीएम हटाव,देश बचाव', 'बॅलेट पेपर जिंदाबाद, ईव्हीएम मुर्दाबाद' म्हणत काढली प्रतीकात्मक प्रेतयात्रा..

ईव्हीएम हटाव,देश बचाव’, ‘बॅलेट पेपर जिंदाबाद, ईव्हीएम मुर्दाबाद’ म्हणत काढली प्रतीकात्मक प्रेतयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशिनवर उमेदवाराचे नावच गायब झाल्याने एकच धांदल उडाली होती.भंडारा नगर परिषदेत सुरवातीच्या दोन प्रभागांची मतमोजणी सुरळीत पार पडली.तिसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू होताच प्रभाग ३ ‘अ’ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नावच ईव्हीएममध्ये नसल्याचे दिसून आले.यामुळे गोंधळ उडाला.संपूर्ण १७ प्रभागांची मतमोजणी संपल्यानंतर प्रभाग ३ ‘अ’ची मतमोजणी करण्यात आली.प्रभाग क्र.३ ‘अ’ मध्ये एकूण ५ उमेदवार व १ नोटा असे ६ पर्याय असणे आवश्यक असतांना मतदान यंत्र तयार करतांना उमेदवार क्र.५ आणि ६ (नोटा)ची नावे झाकली गेली होती.त्यामुळे प्रत्यक्ष मतदान केवळ ४ उमेदवारांसाठीच उपलब्ध करून देण्यात आले.विशेष म्हणजे,मतमोजणी दरम्यान ही गंभीर तांत्रिक चूक निदर्शनास आल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी संबंधित केंद्रातील सर्व सात अधिकारी,कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले.अश्यातच भंडारा जिल्ह्यात ईव्हीएमवर झालेली निवडणूक रद्द करा,सर्व निवडणुका नव्याने बॅलेट पेपरवर घ्या,केवळ कर्मचाऱ्यांचे निलंबन न करता जबाबदार अधिकाऱ्यांनाही निलंबित करा आणि मागण्यांवर १० दिवसांत निर्णय घ्या,अश्या मागण्यांचे निवेदन घेऊन जिल्हाभरातून एकवटलेल्या पराभूत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी व नेत्यांनी भंडारा शहरात ईव्हीएम हटाव,देश बचाव’, ‘बॅलेट पेपर जिंदाबाद, ईव्हीएम मुर्दाबाद’ अशा जोशपूर्ण घोषणा देत  ईव्हीएमची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली.दसरा मैदानावरून या निषेध मोर्चाला प्रारंभ झाला. सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजक राष्ट्रवादी(शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे होते. यात शिंदेसेना नेते आमदार नरेंद्र भोंडेकर,माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गायधने, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय रेहपाढे,आपचे जिल्हाध्यक्ष चंचल साळवे,वंचितचे जिल्हाध्यक्ष शेषराव रामटेके,नगराध्यक्षपदाच्या पराभूत उमेदवार जयश्री बोरकर,डॉ.अश्विनी भौडेकर,सुषमा साखरकर,माधुरी चौधरी यांच्यासह अनेक उमेदवार तसेच राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.गांधी चौक, बसस्थानक मार्गे त्रिमूर्ती चौकात मोर्चा पोहोचल्यावर जाहीर सभेत रूपांतर झाले.जिल्हाधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी आणि मागण्या पूर्ण कराव्या.अन्यथा पुढील १० दिवसांत जिल्हा बंद केला जाईल व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!