Saturday, April 18, 2026
Homeनागपूरआत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे गुन्हा सिद्ध करता येणार नाही- उच्च न्यायालय

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे गुन्हा सिद्ध करता येणार नाही- उच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नऊ वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्यात काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला.त्यामुळे तरुणीने चिठ्ठी लिहून गळफास लावून आत्महत्या केली.त्यानुसार न्यायालयात खटला चालला.सत्र न्यायालयाने तरुणास दोषी ठरवून आरोप सिध्द केले.त्यानुसार तरुणाने उच्च न्यायालयात धाव घेतली.त्यामुळे तरुणास मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निकालात नमूद केले की,केवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे कोणावर गुन्हा सिद्ध करता येणार नाही.न्या.उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.अमरावतीच्या दर्यापूर येथील एका तरुणाचे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील तरुणीशी नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बीसीए पदवीधर असलेल्या तरुणाने लग्नाचे वचन देऊन तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.मात्र,नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.त्याचे दुसऱ्या तरुणीशी संबंध असल्याच्या संशयाने व्यथित झालेल्या तरुणीने ३ डिसेंबर २०२० रोजी चिठ्ठी लिहून गळफास घेतला.न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की,घटनेच्या चार महिने आधीच दोघांमधील नाते संपुष्टात आले होते.व्हॉट्स ॲप चॅटवरून दोघांमधील शारीरिक संबंध सहमतीने झाल्याचे स्पष्ट होते.विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी तरुणीने तरुणाची माफीही मागितली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की,नाते तुटल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गृहीत धरता येणार नाही. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि आत्महत्येचे कृत्य यांच्यात थेट संबंध असणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!