Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता मोबाईल नेटवर्क नसतांनाही पूर्ण होणार ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया..

आता मोबाईल नेटवर्क नसतांनाही पूर्ण होणार ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतात कोणत्या पिकांची लागवड केली आहे; याची नोंद घेण्याकरिता शासनाच्या वतीने ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. पीकपेरा,नुकसान भरपाई व धान विक्री आदीच्या माहितीकरिता व अपडेट राहण्याकरिता ई-पीक पाहणी नोंदणी आवश्यक आहे.मागील काही वर्षापासून शासनाने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या धान पिकाची नोंदणी करण्यासाठी ‘ई पीक ॲप’ची सोय करून दिली आहे.त्यात शेतकऱ्यांनी केलेल्या धान पिकाची नोंद करण्याची सोय आहे.प्रत्यक्षात शेतावर जाऊन शेतकऱ्यांना नोंद घेऊन व फोटो घेऊन त्याची माहिती ॲपवर टाकावयाची असते.मात्र,सदरचा ॲप वापरत असतांना तांत्रिक तसेच मोबाईल नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणींमुळे ई-पीक  पाहणी नोंदणी प्रक्रिया रखडून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत असतात.यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील ई-पीक नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाइन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नेटवर्क नसतांनाही आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून ठेवला तर नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार अनिल पाटील यांनी राज्यातील पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केला होता.प्रसंगी महसूल मंत्री बावनकुळे यांनी ई-पीक पेरा नोंदणीसाठी आता डीसीएस(DCS)प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना नेटवर्क उपलब्ध नसतांनाही शेतातील पिकाचा फोटो मोबाईलवर घेता येतो.नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो फोटो आपोआप प्रणालीवर अपलोड होतो.त्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे नोंदणी थांबण्याची समस्या कमी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे ई-पीक पाहणी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!