Friday, May 29, 2026
Homeमुंबईआज होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट; आरोप-प्रत्यारोपांची मालिका..

आज होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट; आरोप-प्रत्यारोपांची मालिका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज,बुधवार २५ मार्च २०२६ रोजी शेवटचा दिवस असून मागील महिन्याच्या २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला होता.आजच्या अंतिम दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून,नाशिकमधील खरात प्रकरण आणि अजित पवारांच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असून सभागृहात कामकाजाचा तुफान धडाका पाहायला मिळणार आहे.सभागृहात विविध शासकीय व अशासकीय विषयांवर चर्चा रंगणार असून, सदस्यांकडून लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार आहेत.त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे,सदरचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडले.काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी देशातील इंधन टंचाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाच्या तोंडावर इस्त्रायलच्या दौऱ्यावर जाण्याची काहीच गरज नव्हती.देशाच्या नेतृत्वाच्या चुकीमुळे आज सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. देशात कोरोना महामारीच्या काळासारखी स्थिती उद्धवण्याची शक्यता असून,इंधन तुटवड्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील,असे ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणालेत.अश्यातच आज शेवटच्या दिवशी अंतिम आठ प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या...

अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.. – पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!