उद्रेक न्युज वृत्त :-बॉलीवूड मधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी आज,सोमवार २४ नोव्हेंबरला मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीवस्थामुळे धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते व त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अश्यातच आज सकाळच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावल्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. २०१२ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले. त्यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. त्यांच्यापासून त्यांना चार मुले आहेत.सनी देओल,बॉबी देओल,विजेता देओल आणि अजिता देओल.त्यांनी १९८० मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनीशी लग्न केले.धर्मेंद्र यांनी दुसऱ्या लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.हेमा मालिनीपासून त्यांना दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल या आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अभिनेता धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड; ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

