Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारताचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत; आज शपथ विधी सोहळा संपन्न.

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत; आज शपथ विधी सोहळा संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज,सोमवार २४ नोव्हेंबरला शपथ घेतली.राष्ट्रपती भवनातील आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.संविधानाचे सर्वोच्च संरक्षण असलेल्या सरन्यायाधीशांनी संविधानाऐवजी सर्वप्रथम देवाच्या साक्षीने शपथ घेणे चर्चेचा विषय ठरला आहे.काल रविवारी भूषण गवई यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ संपला.ते सहा महिने सरन्यायाधीश राहिले. न्यायमूर्ती कांत यांचा कार्यकाळ सुमारे १४ ते १५ महिन्यांचा असेल.ते ९ फेब्रुवारी २०२७ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त होतील.सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती,बदली आणि पदोन्नतीचे नियमन करणाऱ्या कायद्यानुसार,सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तीना सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाते.या परंपरेनुसार,न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश झाले.सरन्यायाधीश देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च अधिकारी असतात.ते फक्त न्यायमूर्ती म्हणूनच निर्णय घेत नाहीत,तर सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सर्व प्रशासकीय कामांसंदर्भात देखील निर्णय घेतात.कोणत्याही खटल्याची सुनावणी कधी होणार आणि कोणत्या न्यायमूर्तीसमोर ही सुनावणी होणार हे ठरवण्याची मोठी ताकद या पदामध्ये आहे. म्हणूनच सर्वच निकालांमध्ये सरन्यायाधीश हे ‘अप्रत्यक्ष’ शक्ती,असे म्हटले जाते.संवैधानिक,सेवा आणि नागरी कायद्यातील कौशल्यासाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची न्यायालयीन कारकीर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे.या कालावधीत त्यांनी भारतातील विविध न्यायालये आणि कायदेशीर संस्थांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.हरियाणातील हिसार येथे १० फेब्रुवारी १९६२ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली.१९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि त्याच वर्षी हिसार येथील जिल्हा न्यायालयात सराव सुरू केला. १९८५ मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सराव करण्यासाठी चंदीगडला गेले,जिथे त्यांनी संवैधानिक,सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये कौशल्य मिळवले.गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक विद्यापीठे, मंडळे,महामंडळे,बँका आणि उच्च न्यायालयातही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!