उद्रेक न्युज वृत्त :-भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज शुक्रवारी झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप-२०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरून तब्बल सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे.भारताने इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला आहे.भारताने यापूर्वी २०००,२००८,२०१२,२०१८ आणि २०२२ मध्ये विश्वचषक जिंकला होता.अश्यातच आता २०२६ मध्ये हे सहावे जेतेपद पटकावून भारताने अंडर-१९ क्रिकेटमधील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.भारताने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार आयुष म्हात्रेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्ण घेतला.प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून ४११ धावा केल्या.लक्ष्यप्राप्ती करतांना इंग्लंडला फक्त ३११ धावा करता आल्या.यात भारताने तब्बल १०० धावांनी विश्वचषक जिंकला.भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने ८० चेंडूंत १५ चौकार आणि १५ षटकारांसह १७५ धावा केल्या.कर्णधार आयुष म्हात्रे याने ५३ धावा केल्या.४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवरच गारद झाला.
अखेर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला; अंडर-१९ विश्वचषक सहाव्यांदा जिंकला..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

