Friday, July 17, 2026
Homeभंडाराअखेर 'त्या' शेतकरी महिलेची प्राणज्योत मावळली; वाघाने मानेला पकडुन नेले होते फरफटत..

अखेर ‘त्या’ शेतकरी महिलेची प्राणज्योत मावळली; वाघाने मानेला पकडुन नेले होते फरफटत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा परिसरात वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान साकोली तालुक्याच्या उमरझरी शेतशिवारात मिरची तोडत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी होते.माया रामकृष्ण सोनवाने वय ४८ वर्षे,रा.उमरझरी,ता.साकोली,जि.भंडारा
आणि त्यांचे पती रामकृष्ण सोनवाने हे शनिवारच्या सकाळी उमरझरी शेत शिवारात शेतातील हिरव्या मिरच्या तोडत असतांनाच शेतालगतच्या जंगल परिसरातून आलेल्या वाघाने अचानक माया सोनवाने यांच्यावर हल्ला केला आणि महिलेच्या मानेला पकडून काही अंतरापर्यंत फरफटत नेले होते.दरम्यान,जवळच असलेल्या रामकृष्ण यांनी आरडाओरडा केली असता बाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडाओरड करून वाघाला पळवून लावले होते.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी माया सोनवाने यांना खासगी वाहनाने तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ
भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.या ठिकाणी उपचार सुरू असतांनाच प्रकृती अधिक खालावल्याने वनविभागाने त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.या दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा (लकवा)झटका आला होता.विशेष म्हणजे,वाघाने माया सोनवाने यांच्या मानेला तसेच इतर शरीरावर खोल जखमा केल्याने तब्बल पाच दिवस उपचार सुरू असतांनाच त्यांचे काल बुधवारच्या रात्रीच नागपुरात निधन झाले.घटनेने सोनवाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!