Wednesday, June 10, 2026
Homeनवी दिल्लीG20 शिखर परिषद काय आहे; घ्या जाणून..!- यंदाचे अध्यक्षपद भारताकडे; नवी दिल्ली...

G20 शिखर परिषद काय आहे; घ्या जाणून..!- यंदाचे अध्यक्षपद भारताकडे; नवी दिल्ली येथे होणार बैठक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :-G20 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची सध्या नवी दिल्ली मध्ये बैठक सुरू आहे.१ आणि २ मार्च रोजी ही बैठक होणार आहे.G20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे.१९९९ साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती.पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात १९९७ साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला. अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता.

G20 राष्ट्रगटात भारताशिवाय अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया,ब्राझील,कॅनडा,चीन,फ्रांस,जर्मनी, इंडोनेशिया,इटली,जपान,दक्षिण कोरिया,मेक्सिको, रशिया,सौदी अरेबिया,दक्षिण आफ्रिका,तुर्की,ब्रिटन, अमेरिका अशा १९ देशांचा समावेश आहे.युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे.जगातली ६० टक्के लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये राहते.जागाच्या एकूण जीडीपीच्या ८५ टक्के जीडीपी या देशांतून येते.जागतिक व्यापारातील ७५ टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत एकवटला आहे.साहजिकच या राष्ट्रगटाचे काम अतिशय महत्त्वाचे ठरते.G20 देशांचे कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नाही. अजेंडा आणि समन्वय साधण्याचे काम G20 देशांचे प्रतिनिधी करतात.ज्यांना शेरपा म्हणून ओळखले जाते.दरवर्षी एका देशाकडे G20 चे अध्यक्षपद येते.यालाच G20 प्रेसिडंसी म्हणतात.प्रत्येक प्रेसिडंसीच्या शेवटी G20 राष्ट्रगटाची बैठक होते आणि कारभार पुढच्या अध्यक्षांवर सोपवला जातो.G20 चे विद्यमान अध्यक्ष,आधीचे आणि पुढचे अध्यक्ष राष्ट्र यांच्या मदतीने कारभार चालवातात.यंदा २०२३ चे अध्यक्षपद भारताकडे आहे.भारत यंदा इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या मदतीने G20 चा कारभार पाहणार आहेत.तसेच यंदाची G20 शिखर परिषद भारतातच होईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!