उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरात मध्य भारतातील सर्वात मोठे कर्करोग निदान व उपचार रुग्णालय बांधले जात आहे. राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी उद्योगपती रतन टाटा यांना गळ घातली होती. त्यानुसार शंभर कोटी रुपये खर्चुन १४० खाटांचे हे रुग्णालय २०१६ साली बांधण्यास सुरुवात झाली होती.त्यानंतर कोविडमुळे या रुग्णालयाच्या बांधकामाची गती मंदावली.मात्र नंतर हालचाली करत मध्य भारतातील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरणारे हे रुग्णालय बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.या रुग्णालयाचे केवळ दहा टक्के काम शिल्लक असून १५ ऑगस्ट पर्यंत या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा नियोजित केला जात आहे.

