उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
कुरखेडा(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील रा.कुरखेडा,आझाद वार्ड येथे कित्तेक वर्षांपासून वास्तव्यास असणारे आई-वडील यांनी मुलगा व लग्न झालेली मोठी मुलगी व ऐतखाऊ जावई यांच्यासाठी केलेल्या कर्ज(लोन) पायी स्वतःचा घर-दार सोडून नागपूर येथे संपूर्ण आयुष्य म्हातारपणात घालविण्याचा जणू काही निश्चय केला असल्याची हल्ली प्रचिती निदर्शनास येऊ लागली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पूर्वी मोठी मुलगी हिने चंद्रपूर जिल्ह्याच्या मोठ्या शहरात स्वतःच्या मन मर्जीने पळून आपल्याच जातीच्या आठवा वर्ग पास असलेल्या दारुड्या मुलाशी विवाह केले असल्याचे सांगितले जात आहे.मात्र सदर व्यक्ती दारुडा तसेच मारझोड करीत असल्याने पत्नीने स्वतःच एका खाजगी डॉक्टर तसेच त्यांची धुणी-भांडी करून संसाराचे उदरनिर्वाह करून संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.मात्र सदर व्यक्ती स्वतःला ग्रेट समजून पोमाडेंगी फेकण्यात मग्न असतांना दिसून येत आहे.स्वतःला हुशार समजून ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे दिसून येते आहे.’पेली की मेली’ अशी दंडार सदर व्यक्तीची असून त्याला दुजोरा देणारे सासू अन् सासरा समजूत न घालता पोमाडेंगी ऐकण्यात मग्न असल्याने स्वतःच्या मुलीचा स्वतःच संसार उध्वस्त करणार असल्याचे दिसून येत आहे.भाऊ साहेब तुम्ही आज आहा आणि उद्या नाही असे अनेकांचे म्हणणे आहे; आपण पोमाडेंगी करण्यात अर्थ नाही? संसार तुम्ही केलेत त्यामुळे मुले – मुली व इतर गणगोत तयार झालेत? मात्र शिक्षण कमी जरी असेल तरी घुटण्यात अक्कल न ठेवता थोडी जरी लाज बाळगावी; असे अनेक सुज्ञ नागरिकांकडून सुर निघू लागले आहेत.त्यामुळे आपण आपले बघावे; ज्यांचा संसार सुरळीत सुरू आहे; त्यात ढवळाढवळ करू नये; अन्यथा आपल्या करणी मुळे व अती शहाणा त्याचा बैल रिकामा यामुळे पश्र्चाताप तसेच निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्याशिवाय राहणार नाही.

