उद्रेक न्युज वृत्त :-अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे.पिके कोलमडून पडली आहेत तर, शेतीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत.सरकारकडून शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येणार; असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
आज बुधवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आहे.शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल; यासाठी महसूल,कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत; असे आदेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिला आहे.

