- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात आज,गुरुवार १७ सप्टेंबर रोजी काही भागात अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावून वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल आणि पोंभूर्णा तालुक्यात वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत.चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील उसराळा येथे वीज पडून एका गुराख्याचा मृत्यू झाला.दीपक नारायण मडावी वय ३६ वर्षे,रा.उसराळा हे शेळ्या चारण्यासाठी गावालगतच्या परिसरात गेले असता आज दुपारचे दोन वाजताच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना आणि पाऊस सुरू असतांनाच अचानकपणे त्यांच्या अंगावर वीज कोसळली.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे केशव डोनु गुडी वय ५५ वर्षे हे पत्नी वैशाली केशव गुडी वय ४५ वर्षे यांच्यासह शेतातील कामे आटोपून घरी परतत होते.दरम्यान,ऋषी आलाम यांच्या शेताजवळ अचानक वीज कोसळली.या दुर्घटनेत केशव गुडी यांचा मृत्यू झाला,तर पत्नी वैशाली ह्या गंभीर जखमी झाल्या. जखमी वैशाली गुडी यांना तातडीने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
- Advertisement -

