Wednesday, September 9, 2026
Homeगोंदिया'डायल ११२' वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.....

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :- ‘डायल ११२’ हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद गतीने मिळतात. ११२ हा क्रमांक २४ तास सुरू असतो.कॉल केल्यावर काही वेळातच घटनास्थळी मदत पोहोचवली जाते.११२ नंबर डायल केल्यावर नियंत्रण कक्षाला तुमच्या फोनचे अचूक जीपीएस(GPS)लोकेशन कळते,ज्यामुळे मदत पाठवणे सोपे होते.सदरचा कॉल मोबाईल फोन वा लँडलाईनवरून. मोफत करता येतो.पण, ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास थेट कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जातो,ज्यामध्ये दोषी व्यक्तीला एक वर्षाचा कारावास वा १० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.मात्र,काहींना याबाबत माहिती नसल्याने एखादी मस्करी करण्यासाठी वा जाणून- बुजून त्रास देण्यासाठी ‘डायल ११२’ वर खोटी व दिशाभूल करणारी माहिती देण्यात येते.अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध येथील एका ३६ वर्षीय तरुणाने ‘डायल ११२’ वर फोन करून एकाचा खून झाल्याची माहिती दिली.मात्र,प्रत्यक्षात अशी कुठलीही घटना घडलेली नसल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर तरुणावर नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार शामराव उईके वय ३६ वर्षे,रा.माऊली मोहल्ला, नवेगावबांध, ता.अर्जुनी मोरगाव,जि.गोंदिया असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तीन दिवसांपूर्वी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी नवेगावबांध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘डायल ११२’ वर एका व्यक्तीने ‘खून झालाय,लवकर या.!’ अशी माहिती दिली.देण्यात आलेली माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने नवेगावबांध पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन तातडीने घटनास्थळी रवाना झाले.मात्र,घटनास्थळी पोहचताच अशी कोणतीही खुनाची घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित व्यक्तीने केवळ मस्करी करण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे,खोट्या कॉल्समुळे पोलिसांचा मौल्यवान वेळ आणि आपत्कालीन संसाधने वाया जातात,ज्यामुळे खऱ्या गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो.या घटनेमुळे आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!