उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण लहर सुरू आहे.परत हवामान खात्याने काही ठिकाणी काल रविवारसह आज सोमवारीही उष्ण लहरींचा इशारा दिला आहे.विशेष म्हणजे,रविवारी विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी येथे नोंदविण्यात आली.सर्व रेकॉर्ड मोडीत काढून ब्रम्हपुरी येथे ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.तर चंद्रपूर ४५.६,वर्धा ४५.५,नागपूर ४५.४, अमरावती व गडचिरोली ४५.२,गोंदिया ४५,भंडारा ४४.८,अकोला व वाशिम ४३.४,यवतमाळ ४२.८ व बुलढाणा ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाने उकाडा वाढला.अश्यातच आता आज,सोमवार २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे.नवतपा म्हणजे नऊ दिवसांचा काळ म्हणजेच २५ मे ते २ जून २०२६ पर्यंत,या नऊ दिवसांत उन्हाळ्यातील सर्वाधिक ऊन तापते, उन्हाळ्याच्या चार महिन्यांतील उन्हाची कसर या नऊ दिवसांत भरून निघते,असे म्हटले जाते.नवतपामुळे सूर्याची दाहकता आणखी वाढत असते.कडक उन्हात घराबाहेर पडणे जीवघेणेच ठरत असून,कष्टकरी लोकांना मात्र कामासाठी बाहेर पडावेच लागते.म्हणून उन्हाळ्याचे चार महिने लवकरात लवकर संपावेत,अशी कामना सर्व करतात.त्यातही मे महिन्यातील ऊन म्हणजे अंगाला भाजून काढणारे असते.घराबाहेर पडताच अंगाची लाहीलाही करणारे ऊन पडत असल्याने कधी-कधी आपले घर गाठावे,अशीच सगळ्यांची इच्छा असते. त्यामुळे नागरिकांनी जीवाची काळजी घेणे व दुपारी घराबाहेर पडणे टाळावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

