Tuesday, July 7, 2026
Homeवर्धाउभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

उभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घालून घडलेल्या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २३ मे रोजी पहाटेच्या सुमारास तुळजापूर-नागपूर महामार्गावरील वर्ध्याच्या सालोड-नागठाणा(सावंगी बायपास)परिसरात घडली.
मोनाली निलेश मेश्राम वय ३७ वर्षे व किशोरी उके वय ४९ वर्षे दोघीही रा.गजानन नगर,नागपूर अशी मृतक महिलांची नावे आहेत.तर तुषार लक्ष्मणराव जाधव(वाहन चालक)वय ३७ वर्षे,तनिष चंद्रशेखर उके वय ६ वर्षे, दिव्यांशी निलेश मेश्राम वय १० वर्षे,आराध्य संतोष उके वय १३ वर्षे, ईशान्य अनिल बारसकर वय १७ वर्षे,नीता अनिल बारसकर वय ५५ वर्षे,साधना अनिल बारसकर वय ५६ वर्षे,कांचन चंद्रशेखर उके वय ४२ वर्षे अशी जखमींची नावे आहेत.
नागपूरच्या गजानन नगर परिसरातील दहाजण एमएच ४९ यू ०१७९ क्रमांकाच्या इर्टिगा कारने सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर व अक्कलकोट येथे  देवदर्शनासाठी गेले होते.दर्शन आटोपून सर्वजण  महामार्गाने नागपूरकडे परत येत होते.दरम्यान, वर्ध्याच्या सावंगी बायपास मार्गावर भाविकांची कार  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरात जाऊन धडकली.धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले.अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.अपघातात कारमधील आठ जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने वर्ध्याच्या सावंगी मेघे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.रात्रभर ड्रायव्हिंग केल्याने चालकाला झोपेची डुलकी आली असावी आणि सदरचा अपघात घडला असावा,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!