Wednesday, July 8, 2026
Homeभंडारापरीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर घडली असून आज रविवारी सर्वत्र उघडकीस आली. नावेद(नवल)होलाराम खंडाते वय १८ वर्षे,रा.रोंघा असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या बारावीचा काल शनिवारी निकाल जाहीर झाला.यात नावेद हा परीक्षेत नापास झाला.यामुळे तो मानसिक तणावात गेला.परीक्षेत नापास झाल्याची खंत उराशी बाळगून त्याने दुपारीच शेत गाठले आणि शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.गोबरवाही पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.विशेष म्हणजे,विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी आणि मेहनतीची आवश्यकता असते. शिक्षण म्हणजे संपूर्ण आयुष्य नव्हे,तर यशाचा केवळ एक मार्ग आहे.अपयशावर मात करून यशस्वी व्यावसायिक किंवा मोठ्या हुद्‌द्यावर पोहोचलेली अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे,आत्महत्या हा कोणत्याही संकटावरचा पर्याय वा उत्तर असूच शकत नाही.आठवी नापास विद्यार्थी पुढे शिकून आयपीएस अधिकारी बनतो,तर जिंकणे व हरणे हा जीवनातील नित्याचाच क्रम ठरवून पुढील भवितव्य घडवणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; शिक्षकांच्या प्रश्नांकडे वेधणार लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकांचे राज्य स्तरावर प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना,शिक्षक संघटना समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,...

‘पावसाळा आला आरोग्य सांभाळा..!’ ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला,डेंग्यू,मलेरिया,टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो.नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,यासाठी सार्वजनिक...

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!