Sunday, September 6, 2026
Homeगोंदियाघराजवळ खेळत असतांना वाघाचा हल्ला; चिमुकल्याचा मृत्यू..

घराजवळ खेळत असतांना वाघाचा हल्ला; चिमुकल्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-चंद्रपूर,नागपूर,भंडारा व आता गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात वाघाची डरकाळी अन् मनुष्याचा जीव घेण्याच्या घटना उघड होऊ लागल्या आहेत.अश्याच प्रकारे काल शुक्रवारच्या रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घराजवळ खेळत असलेल्या एका सहा वर्षीय चिमुकल्याला वाघाने ठार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात उघडकीस आली आहे.प्रज्वल गोवर्धन मेश्राम वय ६ वर्षे,रा.आदर्श धाबेटेकडी,ता.अर्जुनी-मोरगाव,जि.गोंदिया असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृत चिमुकल्याचे नाव असून तो घराजवळ खेळत होता.खेळत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे प्रज्वलवर हल्ला चढवला आणि जंगलाच्या दिशेने ओढत नेले.दरम्यान,सदरचे दृश्य कुटुंबियांच्या नजरेस पडताच त्यांनी आरडाओरड केली. लागलीच ग्रामस्थांनीही जोरजोराने ओरडायला सुरुवात केल्याने वाघाने चिमुकल्याला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.त्यानंतर,ग्रामस्थांनी एकत्र येत तात्काळ शोधमोहीम सुरू केली.काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र,तो पर्यंत चिमुकल्याने प्राण सोडला होता.घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूने कुटूंबीय शोकसागरात बुडाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!