Wednesday, April 15, 2026
Homeचंद्रपूरबैल,गाय व गोऱ्यांची अमानुष वाहतूक; ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

बैल,गाय व गोऱ्यांची अमानुष वाहतूक; ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने मोठी कारवाई करत गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशीय जनावरांची वाहतूक उघड केली.नाकाबंदी दरम्यान दोन ट्रक पकडले व त्यातून ५२ जनावरांची सुटका करण्यात आली असून सुमारे ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काल बुधवारी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोयगाव मार्गावर विशेष नाकाबंदी करण्यात आली.नाकाबंदी दरम्यान संशयित ट्रक क्रमांक-सीजी ०४ पी क्यू ७५७९ तसेच दुसरे जडवाहन अडवून त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन्ही ट्रकमध्ये एकूण ५२ गोवंशीय जनावरे(बैल,गाय व गोरे)अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले.यामध्ये तीन जनावरे मृत अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले.या प्रकरणी आरोपी सादिक कुरेशी रा.गडचांदूर,जि.चंद्रपूर तसेच दोन्ही ट्रकचे चालक यांच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींवर प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत पोलिसांनी ५२ गोवंशीय जनावरे तसेच दोन ट्रक असा एकूण अंदाजे ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार,पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर,सर्वेश बेलसरे तसेच स्वामीदास चालेकर,अजय बागेसर,किशोर वैरागडे,प्रमोद डंभारे,गोपीनाथ नरोटे व वृषभ बारसिंगे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!