- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा परिसरात वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान साकोली तालुक्याच्या उमरझरी शेतशिवारात मिरची तोडत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी होते.माया रामकृष्ण सोनवाने वय ४८ वर्षे,रा.उमरझरी,ता.साकोली,जि.भंडारा
आणि त्यांचे पती रामकृष्ण सोनवाने हे शनिवारच्या सकाळी उमरझरी शेत शिवारात शेतातील हिरव्या मिरच्या तोडत असतांनाच शेतालगतच्या जंगल परिसरातून आलेल्या वाघाने अचानक माया सोनवाने यांच्यावर हल्ला केला आणि महिलेच्या मानेला पकडून काही अंतरापर्यंत फरफटत नेले होते.दरम्यान,जवळच असलेल्या रामकृष्ण यांनी आरडाओरडा केली असता बाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडाओरड करून वाघाला पळवून लावले होते.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी माया सोनवाने यांना खासगी वाहनाने तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ
भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.या ठिकाणी उपचार सुरू असतांनाच प्रकृती अधिक खालावल्याने वनविभागाने त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.या दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा (लकवा)झटका आला होता.विशेष म्हणजे,वाघाने माया सोनवाने यांच्या मानेला तसेच इतर शरीरावर खोल जखमा केल्याने तब्बल पाच दिवस उपचार सुरू असतांनाच त्यांचे काल बुधवारच्या रात्रीच नागपुरात निधन झाले.घटनेने सोनवाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

