उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ पासून सुरू केलेली ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी ठरू लागली आहे.या योजनेचा लाभ दरमहा दीड हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांना दिला जातो.योजनेअंतर्गत फेब्रुवारी-२०२६ पर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभ देण्यात आला आहे.अश्यातच ज्या महिलांनी ई-केवायसी करतांना चुका केल्या होत्या,अशांसाठी शासनाकडून ३१ मार्च २०२६ ही अंतिम तारीख देण्यात आली होती.मात्र,राज्यातील जास्तीत-जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि तांत्रिक कारणांमुळे कोणीही वंचित राहू नये,यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज,बुधवार १ एप्रिल रोजी या योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा केली आहे.त्यानुसार,आता सदरची मुदतवाढ ही चालू महिन्याच्या ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.यामुळे महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी आणखी ३० दिवस मिळाले आहेत.ई-केवायसी प्रक्रियेत काही महिलांकडून त्रुटी राहिल्यामुळे त्यांना अडचणी येत होत्या.त्यामुळे,सदरची मुदतवाढ ही शेवटची संधी,असल्याचे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार सदरची मुदतवाढ देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अखेर लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी मुदतवाढ..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

