Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजकृषी पंपांना २४ तास वीज पुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक - कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर...

कृषी पंपांना २४ तास वीज पुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक – कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा व जेल भरो आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यातील शंकरपूर व परिसरातील शेतकरी बांधवांनी कृषी पंपांना २४ तास वीज पुरवठ्यासाठी आज १६ मार्च २०२३ रोजी कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा व जेल भरो आंदोलन करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आक्रमक पावित्रा घेत देसाईगंज येथील महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत उर्जा विभागाचेव्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनातुन २४ तास वीज पुरवठा करण्याची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले.

 आंदोलना दरम्यान येथील शेतकऱ्यांनी एकुणच शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करत २४ तास वीज पुरवठ्यासाठी आग्रही असलेल्या आमदारांनी सत्तेत येताच शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले असल्याने येत्या निवडणुकांत तालुक्याच्या कोणत्याही गावात प्रचार करू न देण्याचा एकमताने निर्णय घेत ‘जो किसान की बात करेगा,वही देश पे राज करेगा’ च्या जोरदार घोषणा देत परिसरातील हजारो संख्येच्या सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शंकरपुर स्थित महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले.

दरम्यान आंदोलन हिंसक वळण घेणार नाही याची दक्षता घेत देसाईगंज पोलिसांनी शेकडो आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले होते. यात प्रामुख्याने जेष्ठ नेते परसराम टिकले,सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके,नंदु नरोटे,पिंकु बावणे,नितीन राऊत,वामन सावसाकडे, गजानन सेलोटे,विलास बन्सोड,विलास ढोरे,होमराज हारगुळे,नरेशलिंगायत, विनायक वाघाडे,जगदीश शेंद्रे,मनोज ढोरे,अभय नाकाडे,महेश भरणे,अभय बुद्धे,आशिष गभने,युवराज गभणे,चक्रधर नाकाडे,बालु दुनेदार,यादव बन्सोड,संदिप वाघाडे,उमाशंकर हारगुळे,गणेश वारगुळे आदी शेतकऱ्यांना देसाईगंज पोलिसांनी स्थानबद्ध करून अटी व शर्थिच्या अधिन राहुन सोडले.तथापी शेतकऱ्यांची मागणी पुर्ण करण्याकडे दुल॔क्ष करून तोंडाला पाने पुसल्या गेले असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत येत्या तीन दिवसाच्या आत मागणी मान्य करून किमान १६ तास वीज पुरवठा करण्यात न आल्यास देसाईगंज येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालया समोर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!