Sunday, May 31, 2026
Homeब्रम्हपुरीतरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.. -ब्रम्हपुरी तालुक्यातील आजची घटना..

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.. -ब्रम्हपुरी तालुक्यातील आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरीच स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज,शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.सदरची घटना ही ब्रम्हपुरी तालुक्याच्या खंडाळा गावात घडली.रोहित रवींद्र हरडे वय २५ वर्षे,रा.खंडाळा,ता.ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो ब्रम्हपुरी शहरातील एका राईस मिलमध्ये ऑपरेटर म्हणून काम करायचा.
नेहमीप्रमाणे आज शनिवारी सकाळच्या सुमारास रोहितला झोपेतून जागे करण्यासाठी पालकांनी त्याच्या खोलीचे दार ठोठावले.खोलीचे दार आतून बंद असल्याने बराच वेळ आवाज देऊनही त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे पालकांना संशय आला.घरा शेजारील नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत खोलीचे दार तोडून आत प्रवेश करताच रोहित गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.समोरील दृश्य पाहून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला.लागलीच उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.विशेष म्हणजे,रोहितला ऑनलाईन गेम खेळण्याची लत लागली होती.त्यात तो पैसे गुंतवायचा. असे करता-करता पैसे हरत गेला आणि तो कर्जबाजारी झाला.यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!