- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सायबर फसवणूक करणारे चोरटे वेगवेगळ्या माध्यमांतून नागरिकांना जाळ्यात ओढू लागलेत.यात डिजिटल अरेस्ट,एपिके फाईल पाठवणे, आरटीओ चालान,लिंक पाठवणे,एडिट फोटो पाठवणे, मोबाईलद्वारे संपर्क साधून अंगणवाडी कर्मचारी बतावणी करून बँक खात्याविषयी माहिती घेणे वा नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या वापरून फसवणूक करू लागले.अश्याच प्रकारे चोरट्यांनी पोलिसांनंतर आता रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF)नावाखाली एक नवीन सायबर फसवणुकीची पद्धत समोर आली आहे.या फसवणुकीमध्ये,अज्ञात चोरटे साधारण लोकांना ‘डिजिटल अटक’ सांगून त्यांची फसवणूक करीत आहेत.फसवणूक करणारे लोकांना फोन करतात आणि त्यांना सांगतात की,त्यांचे नातेवाईक गॅस सिलिंडरसह पकडले गेले किंवा तिकिटाशिवाय रेल्वे प्रवास करीत असल्यामुळे आरपीएफच्या ताब्यात आहेत. त्यानंतर आरोपी कायदेशीर कारवाई आणि मोठ्या दंडाची धमकी देऊन ऑनलाइन पैसे उकळतात.या फसवणूक प्रकरणांची खास वैशिष्ट्ये म्हणजे,आरोपींनी आरपीएफशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.ते इतके धूर्त आहेत की,व्हिडीओ कॉलद्वारे बनावट आयडी, कागदपत्रे आणि नातेवाईकांच्या आवाजाचा वापर करतात.पीडितांना घाबरवून,ते पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडतात. आरोपी व्हॉट्सॲपद्वारे एक क्यूआर कोड पाठवून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात.याचवेळी, कायदेशीर कारवाईची धमकी दिली जाते आणि हे प्रकरण गोपनीय असल्याचे सांगितले जाते.अश्या प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांना जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे.विशेष म्हणजे,
आरपीएफ किंवा इतर कोणतीही तपास संस्था फोन किंवा व्हिडीओ कॉलवर दंड आकारत नाही आणि डिजिटल अटकसारखी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नाही.त्यामुळे,पीडितांनी घाबरू नये आणि ताबडतोब कॉल डिस्कनेक्ट करून सत्यता पडताळण्यासाठी पुढील पाऊले उचलणे गरजेचे आहे.
- Advertisement -

