- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपुर :-एकीकडे शिक्षकांची पदे रिक्त आहेत,तर दुसरीकडे राज्यात ५५ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या बातम्या येतात.शिक्षण हा इतका महत्वाचा विषय असूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत.सात वर्ग आणि फक्त तीन शिक्षक; विद्यार्थी काय शिकणार?राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.त्यामुळे सरकारने या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात,असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज,शुक्रवार १२ डिसेंबरला विधानसभेत मागणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.यावर बोलतांना वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.सरकारने राज्यात शिक्षकांची किती पद रिक्त आहेत आणि एका मर्यादित कालावधीत या जागा भराव्या अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.यावर उत्तर देतांना मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यात १५ हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती सभागृहात दिली.यावर वडेट्टीवर यांनी आक्षेप घेतला.राज्यात ३७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत,अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहे.सरकारच्या पोर्टलचे नाव पवित्र असले तरी अपवित्र काम सुरू आहे,अशीही टीका वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.
- Advertisement -

