Wednesday, August 26, 2026
Homeनागपूरउद्या होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द..

उद्या होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपुर :-मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उद्या,बुधवार ३ डिसेंबर होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द केली आहे. येत्या २० डिसेंबरला उर्वरित ठिकाणी मतदान झाल्यानंतर २१ डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. निकाल,निवडणूक पुढे जात आहेत.ही काही योग्य पद्धत नाही.निवडणूक आयोग,खंडपीठ स्वायत्त आहे,त्यामुळे ते मान्य करावे लागेल.पण यातून भ्रमनिरास होतो.काही चूक नसतांना असे होणे योग्य नाही असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास २४ नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती.ही निवडणूक २० डिसेंबरला होणार होती.त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा २४ नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो,अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.याबाबतचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.आज मतदान झाले तरी त्याचे निकाल २१ तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील.तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत  निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही २० डिसेंबरपर्यंत लागू राहील,असे न्यायालयाने स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी हायकोर्टाच्या निकालावर भाष्य करतांना म्हटले की, “मी निकाल वाचलेला नाही.पण जर खंडपीठाने निर्णय दिला असेल तर तो मान्य करावा लागेल.पण जवळपास गेली २५ ते ३० वर्ष मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे. पण असे पहिल्यांदा घडत आहे की,घोषित केलेल्या निवडणुका,त्यांचे निकाल पुढे चालले आहेत.ही पद्धत  योग्य वाटत नाही.अर्थात खंडपीठ स्वायत्त असल्याने त्यांचा निर्णय मान्य करावा लागेल”. “जिथे सगळ्या गोष्टींचे पालन झाले आहे तिथे कोणीतरी कोर्टात गेले. कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही.पण फक्त कोर्टात गेल्याने निवडणुका पुढे नेणे हे कोणत्याच तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचे घडले आहे.मी त्याबाबत अधिक बोलणार नाही.मी यासंदर्भात वैयक्तिक नाराजी आधीही प्रकट केली असून,ती निवडणूक आयोगावर नसून कायद्यावर आहे,” असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.”फक्त २४ ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत,म्हणून सगळी मतमोजणी पुढे करणे मला तरी योग्य वाटत नाही,” असेही ते म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!