Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजअन् सरपंच म्हणू लागले; 'पावसाळ्यामुळे जंतू असू शकतात'..! - ऊसेगावात आढळला पिण्याच्या...

अन् सरपंच म्हणू लागले; ‘पावसाळ्यामुळे जंतू असू शकतात’..! – ऊसेगावात आढळला पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य जंतू; शिवराजपूर गट ग्रामपंचायतीतील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या
मुलचेरा तालुक्यात डेंग्यूचा उद्रेक सुरू असून आतापर्यंत ६ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन दोन डॉक्टर व दोन आरोग्य सहाय्यकांवर कारवाई करण्यात आली आहे.सध्या स्थितीत डेंग्यूचा प्रकोप असलेल्या भागात आरोग्य विभागाची एकूण २९ पथके तैनात केली आहेत.डेंग्यूच्या एकूण ६९० चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी तापाचे २११ तर डेंग्यूचे ११८ रुग्ण आढळले आहेत.सध्या २८ जणांवर उपचार सुरु आहेत.अश्यातच जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले असतांनाच देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ऊसेगाव येथील पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य जंतू आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली.त्यातच पिण्याच्या पाण्यात ‘पावसाळ्यामुळे जंतू असू शकतात’ असे मिश्किलपणे सरपंचांनी उत्तर दिल्याने सर्वजण अवाक् होऊन दिलेल्या उत्तरात प्रश्न पाहू लागलेत.यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
देसाईगंज तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर शिवराजपूर गट ग्रामपंचायत आहे.यामध्ये शिवराजपूर,ऊसेगाव व फरी गावांचा समावेश होतो. सदर ग्रामपंचायतीत मागील वर्षात जल जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपयांची पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आणि ‘हर घर जल’ च्या माध्यमातून ग्रामपंचायतीतर्फे गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.त्यातच काल,शनिवार १६ ऑगस्ट रोजी ऊसेगाव येथील अजय नेवारे यांच्या कुटुंबातील सदस्य सायंकाळच्या सुमारास नळाद्वारे पिण्याचे पाणी भरत असतांनाच पाण्यात नारू सदृश्य जंतू आढळून आल्याने एकच खळबळ माजली.त्यानुसार ग्रामस्थांनी एकच गर्दी करून याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास कळवले. अश्यातच जेव्हापासून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले तेव्हापासून टाकीची सफाईच करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून सदरच्या प्रकारामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला आहे.
  • सुषमा सयाम,सरपंचा शिवराजपूर गट ग्रामपंचायत👇
पावसाळा असल्यामुळे जंतू अशू शकतात,आमचे कर्मचारी नियमित ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याच्या टाकीची साफ-सफाई करतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!