- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-गेले अनेक दिवसांपासून रास्त भाव दुकानदारांची मार्जिन मध्ये वाढ करण्याची मागणी होती.याबाबत अनेक बैठका देखील पार पडल्या होत्या.रास्त भाव दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक होते.त्यामुळे मंत्रिमंडळाने राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या अर्थात राशन दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज,मंगळवार १२ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्याच्या वितरणासाठी रास्त भाव दुकानदारांना सध्या देण्यात येणाऱ्या १५०/- रुपये प्रति क्विंटल (१५०० रुपये प्रति मेट्रिक टन)या मार्जिन दरामध्ये २०/- रुपये प्रति क्विंटल (२०० रुपये प्रति मेट्रिक टन) एवढी वाढ करून त्यांना १७०/-रुपये प्रति क्विंटल (१७०० रुपये प्रति मेट्रिक टन) मार्जिन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.यामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजित वार्षिक ९२.७१ कोटी रुपये इतका अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
- Advertisement -

