Monday, September 7, 2026
Homeपुणेदुचाकीला हायवा ट्रकची धडक; वडिलांसह दोन चिमुकलींचा मृत्यू..

दुचाकीला हायवा ट्रकची धडक; वडिलांसह दोन चिमुकलींचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-दोन मुलींना घेऊन जात असलेल्या वडिलांच्या दुचाकीला एका हायवा ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रकच्या खाली येऊन चिमुकल्यांच्या वडिलांचा जागेवरच मृत्यू झाला,तर दोन मुलींचा रुग्णालयात नेत असतांना वातेच मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना आज,रविवार २७ जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या बारामती शहरात दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. अपघातात राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन मुली, सई वय ११ वर्षे आणि मधुरा वय ५ वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेने बारामती शहरात शोककळा पसरली आहे.
ओंकार आचार्य हे आपल्या दोन्ही मुलींसह एमएच ४२ बी ४८४४ क्रमांकाच्या दुचाकीवरून शहराच्या खंडोबानगर चौकातून जात होते.त्याचवेळी वेगाने येणाऱ्या एमएच १६ सी ए०२१२ क्रमांकाच्या एका हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेत तिघेही हायवा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला,तर सई आणि मधुरा यांना तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पोलिसांनी हायवा ट्रक चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत एकच गर्दी केली.मृतदेहांचे हृदयद्रावक दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.पोलिसांनी तातडीने कारवाई करत मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.घटनेने आचार्य कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!