Friday, April 17, 2026
Homeनागपूरकाय सांगता..? घराच्या अंगणात असलेल्या विहिरीतील थंड पाणी येऊ लागले गरम..!

काय सांगता..? घराच्या अंगणात असलेल्या विहिरीतील थंड पाणी येऊ लागले गरम..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-घराच्या अंगणात असलेल्या विहिरीचे थंड पाणी अचानक गरम येऊ लागल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरू लागला आहे.नागपूरच्या काटोल शहरातील नीलकंठ फुके,रा.पॉवर हाउस परिसर,काटोल यांच्या मालकीची ही विहीर असून,ती किमान ३० फूट खोल आहे.या विहिरीचे खोदकाम  फार पूर्वी करण्यात आले.विहिरीतील पाण्याचा वापर नियमित होत असल्याने पाण्याचा उपसाही होत आहे. तेव्हापासून तर दोन दिवसांपूर्वीपर्यंत या विहिरीचे पाणी थंड होते.घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे.त्यातच दोन दिवसांपासून या विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे पहिल्यांदा कामावरील कामगारांच्या निदर्शनास आले.शेजारच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केली असता ते थंड असल्याचे नीलकंठ फुके यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सदरची माहिती स्थानिक नगरपालिका प्रशासनाला दिली आहे.पाण्यातून वाफ निघत नसली तरी ते विहिरीतून काढून लगेच आंघोळीसाठी वापरण्याजोगे कोमट असून पाण्याला कुठलाही गंध नाही.त्यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडत आहे,हे तपासणी अंतीच कळणार आहे.काहींच्या मते हा भूगर्भातील काही हालचालींचा परिणाम असावा,तर काहींनी गरम झरे किंवा जिओथर्मल ॲक्टिव्हिटीची शक्यता व्यक्त केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!