Monday, September 7, 2026
Homeमुंबईबापरे.! चक्क पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट,चमचे, वाट्या व ग्लास चांदीचे; एका थाळीचे जेवण...

बापरे.! चक्क पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट,चमचे, वाट्या व ग्लास चांदीचे; एका थाळीचे जेवण ४ हजार ५५० रुपये.. – बरं झालं ताटात जेवायला सोने दिले नाहीत- खासदार संजय राऊत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-नुकताच संसद व राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांचा दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा काल मंगळवारी मुंबईत समारोप झाला.संसद व विधिमंडळाची अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते.पण,याच समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या दोन दिवसांच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून त्यावर लाखोंचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.लक्षवेधनारी बाब म्हणजे, काटकसरीवर चर्चा करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट,चमचे,वाट्या व ग्लास हे चक्क चांदीचे होते. पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था निखील केटरर्सकडे होती.यासाठी चांदीची भांडी भाड्याने आणली होती.एका ताटाचे दिवसाचे भाडे ५५० रुपये होते.तर एका थाळीचा दर ४ हजार रुपये होता. विधिमंडळातील अधिकाऱ्यांनीच याची पुष्टी केली आहे.भोजनात कोथिंबीर वडी,मालवणी करी,सुरमई फ्राय,दहीवडे, बटाट्याची भाजी व पुरण पोळी असा माठी मेन्यू होता.एकीकडे राज्य कर्जाच्या खाईत असतांना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते.राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतांना चांदीच्या ताटात जेवण देण्याची काही गरज होती कां? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.तर उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘बरं झालं चांदीच्या ताटात सोने जेवायला दिले नाहीत तर’..अशी टीकेची तोफ डागली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी  नाही,धानाचा बोनस नाही, गरीब,शेतकरी,सामान्य जनतेला त्यांचे हक्काचे पैसे सरकार देत नाही आणि अंदाज समितीच्या बैठकीला येणाऱ्यांसाठी मात्र चांदीच्या ताटात जेवण दिले जाते. सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असतांना राज्यकर्ते उधळपट्टीत लागले,असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!