- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-आपल्या आईपुढे कितीही संकटे उभी ठाकलीत तरीही आई एवढे दुःख जगात कुणीही पचवूच शकत नाही.मात्र,स्वतःच्या मुलांचे संसार उघड्यावर पडल्याने चिंतातुर झालेल्या आईला दुःख सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का येऊन मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना गोंदिया जिल्ह्याच्या
देवरी तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुंबडीकसा येथे काल,गुरुवारी १२ जून रोजी घडली.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुंबडीकसा येथे गिरधारी अरकरा,विनोद,रामू आणि मेसराम या चार भावांचे कुटुंब आईसह एकाच घरात राहत होते.अरकरा हे १० रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेजारच्या घरी बसलेले होते.दरम्यान अचानक सोसायट्याचा वारा सुरू झाल्याने घरावरून जाणाऱ्या विद्युत तारांचे एकमेकांना घर्षण होऊन आगीची ठिणगी अरकरा यांच्या घरावर पडली.वाऱ्यामुळे संपूर्ण घराला आग लागली.शेजारी व गावकऱ्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी अरकरा यांच्या घराकडे धाव घेतली व आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.परंतु आग आटोक्यात येईपर्यंत चारही भावांचे संपूर्ण घर जळून राख झाले होते.आगीत पैसे,धान्य,कपडे,तांदूळ, शेतीकरिता घेतलेले बियाणे,महत्वपूर्ण दस्तऐवज पूर्णतः जळाले.तलाठी गायधने,कोतवाल कोटांगले, सरपंच रामदेव सौरी,पोलिस पाटील गुलाबदास हिरवाणी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा तयार करून शासनाला अहवाल पाठविला.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली.तरी आगीमुळे चार भावंडांच्या घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अरकरा कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.त्यातच आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.यात आता आपले कुटुंब कसे सावरणार? अशी चिंता चारही भावडांची ६० वर्षीय आई मानकुवर लतखोर अरकरा यांना सतावू लागली. घर जळाल्याचे दुःख त्या सहन करु शकल्या नाही. यातच काल गुरुवारी त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने अरकरा कुटुंबीयांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
- Advertisement -

