- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर गट ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१५ ते २०२० मध्ये १४ वित्त आयोग निधीचा अपहार व बोगस कामांची चौकशी करून चौकशीअंती दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार भाजपाचे पंचायत राज व ग्राम विकास विभागचे गडचिरोली जिल्हा सहसंयोजक कैलास बगमारे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांच्याकडे केली होती.अश्यातच देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांनी देसाईगंज बीडीओ यांना कार्यवाही करण्यासंदर्भात पत्रनिशी कळवूनही अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचे दखल घेण्यात येत नसल्याने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.
अधिक माहिती अशी की,देसाईगंजच्या तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मानसी यांनी कैलास बगमारे यांच्या दिलेल्या तक्रारीअनुषंगाने २२ मे २०२५ ला बीडीओ पत्रव्यवहार करून तात्काळ तक्रार अर्जावर योग्य ती कार्यवाही करून सदर कार्यवाही बाबत अर्जदाराला परस्पर कळवावे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे सादर करावा असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.मात्र, २३ दिवसांचा कालावधी लोटूनही अजून पावेतो कुठल्याही प्रकारची चौकशी वा कार्यवाही करण्यात येत नसल्याने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे कैलास बगमारे यांनी म्हटले आहे.
- Advertisement -

