- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस येत्या दोन दिवसांत राज्यात धो-धो बरसणार असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.आज,गुरुवार १२ जून रोजी कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात ढगफुटी सारखा पाऊस कोसळला. राज्यात पुढील दोन दिवस पावसाचे अलर्ट हवामान विभागाने जारी केले आहे. तळकोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यास आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यातच कोल्हापूर, सांगली,रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तसेच विदर्भातील वाशिम, अकोला,अमरावती,यवतमाळ,वर्धा,नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांनाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान केंद्रानुसार,नैऋत्य मोसमी पावसाने मुंबईसह अहिल्यानगरचा पट्टा गाठला आहे.आता मान्सून पूर्वेकडील भागात सरकत आहे.पुढील ४८ तासांत विदर्भ,छत्तीसगड,ओडिसा या भागात मान्सून व्यापला जाणार आहे.बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने कर्नाटक,छत्तीसगड,महाराष्ट्र या राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
- Advertisement -

