Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तधावपट्टीवरून उड्डाण करताच विमानाचा अपघात; विमानात २४२ नागरिक..

धावपट्टीवरून उड्डाण करताच विमानाचा अपघात; विमानात २४२ नागरिक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-गुजरातमधील अहमदाबाद येथे आज,गुरुवार १२ जून रोजी दुपारच्या सुमारास एअर इंडियाचे एआय-१७१ नावाचे एक प्रवासी विमान कोसळले असून सदरचे विमान हे लंडनच्या गॅटविकला जात होते.विमानात २४२ प्रवासी,२ वैमानिक आणि १० कर्मचारी होते.त्यापैकी १६९ प्रवासी भारतीय,तर ५३ ब्रिटिश नागरिक होते,यातील १ व्यक्ती कॅनेडियन होता,तर ७ पोर्तुगालचे नागरिक होते.धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर मेघानीनगर परिसरात जमिनीवर कोसळला.अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलर नुसार, या विमानाने अहमदाबादहून दुपारी १.३९ वाजता उड्डाण केले.त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला डिस्ट्रेस कॉल केला,परंतु त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलर कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.धावपट्टी २३ वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर पडला.विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती.सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.एअर इंडियाने १८००५६९१४४४(1800 5691 444)हा हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केला आहे.सदरचा नंबर फक्त या अपघाताशी संबंधित माहितीसाठी जारी करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!