- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेती व्यवसाय करीत असतांना बऱ्याच कारणांनी शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अंपगत्व ओढावते.घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊन अडचण निर्माण होते.म्हणून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेमुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळत आहे.शेतात काम करीत असतांना होणारे अपघात, संपदर्श,नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे मृत्यू,रस्ता अपघात,वाहन अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा प्रस्ताव मंजूर झाल्यास दोन लाख रुपये,एक हात व एक पाय असे दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख,एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत मिळत असते.राज्यातील सर्व शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य (आई-वडील,शेतकऱ्याची पती/पत्नी,मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
- Advertisement -

