Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तखोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये- कृषी...

खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये- कृषी विभाग

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-यंदाचे मान्सून दहा दिवस अगोदरच आले असून सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.धानपीक, कांदा तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती देखील निर्माण झाली आहे.राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीच वादळी पाऊस पडला आहे.आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये,असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.२७ मे नंतर हवामानात बदलाचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये.काही ठिकाणी पाऊस संदर्भात खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावे,असेही कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!