Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजआज देसाईगंज येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवणपटलावर...

आज देसाईगंज येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवणपटलावर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन.. – महात्म्यांना केवळ वर्ग-जाती पुरतेच मर्यादीत ठेवू नका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नुकतीच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अशातच ज्या लोकांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या वर्गसमूहाशी जोडले,अश्यांनी त्यांना फक्त त्यांच्या वर्गापुरतेच मर्यादीत ठेवले आहे.म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ माळी समाजाचेच तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बौद्ध समाजाचेच असल्याची भावना अनेकांच्या मनात रुजलेली दिसून येत आहे.इतर वर्ग आणी धर्माचे लोकही त्यांना फक्त शोषितांचे नायक म्हणून पाहू लागलेत.परंतू समतेच्या क्रांतीचे जनक व भारतीय संवीधानाच्या शिल्पकाराचा आदर केवळ त्यांना एखाद्या विशिष्ट समुदायाचा नायक म्हणून न दाखवता राष्ट्रीय नायक म्हणून चित्रीत करुनच करता येईल.जात-वर्ग-द्वेष या मानसिकतेतून बाहेर पडल्याशिवाय हे शक्य नाही.म्हणून राष्ट्रीय नायक महात्मा ज्योतीबा फुले व समता,स्वातंत्र्यता, बंधूता आणि सामाजिक न्याय यांचे प्रखर प्रणेता राष्ट्रीय नायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्य फक्त राष्ट्रीय संस्कृती प्रदर्शित करावी व या थोर राष्ट्रनिर्मात्यांच्या विचारांचा वारसा भावी पिढींना प्रेरणादायी ठरावा आणी त्यांनी सांगीतलेल्या क्रांतीकारी विचारांची ज्योत मनामनात सदोदीत तेवत रहावी,या मंगलमय कामनेतून आज,शुक्रवार १८ एप्रिलला  राष्ट्रनिर्माते विचारमंच,देसाईगंज (वडसा) यांच्या वतीने शहराच्या फव्वारा चौक या ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात आज सायंकाळी ५ वाजे आकाश अंबादे व संच यांचे सांस्कृतीक प्रबोधन व सायंकाळी ६ वाजता वैचारीक प्रबोधन होणार आहे.वैचारीक प्रबोधनामध्ये डॉ.प्रकाश राठोड साहीत्यीक नागपूर, सर्जनादित्य मनोहर साहीत्यीक नागपूर,छायाताई खोब्रागडे सामाजीक कार्यकर्त्या नागपूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी सदर कार्यक्रमाचा जास्तीत-जास्त जनतेनी लाभ घ्यावा,असे आवाहन राष्ट्रनिर्माते विचारमंच,देसाईगंज(वडसा)च्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!