Tuesday, May 26, 2026
Homeगडचिरोलीकाँग्रेसच्या आंदोलनास यश..! अखेर आज गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले.....

काँग्रेसच्या आंदोलनास यश..! अखेर आज गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले.. – नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या पाणीटंचाईवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदी पात्रात ५ एप्रिल २०२५ रोजी भर उन्हात काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन केले होते.सदरचे आंदोलन हे भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी करण्यात आले होते.सदरच्या आंदोलनास यश आल्याचे दिसून येत आहे.अखेर आज,शनिवार १२ एप्रिल रोजी गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात ४० कुमेक्सने  पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांतील नागरिक,शेतकरी व मत्स्यव्यावसायिक यांना गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वैनगंगा नदीकिनारी असलेले देसाईगंज(वडसा), आरमोरी व चामोर्शी तालुक्यांतील सर्व गावांमध्ये तलाठी व कोतवाल यांच्या माध्यमातून नागरिकांना सावध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नदीपात्रात शेती करणारे शेतकरी,मासेमारी करणारे,नदीकिनारी पाणी पिण्यासाठी गुरे नेणारे नागरिक तसेच पूल,रस्ते बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी
खबरदारी घ्यावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!