Wednesday, July 29, 2026
Homeदेसाईगंजशिवरायांची हिंदवी स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती- माझी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे...

शिवरायांची हिंदवी स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती- माझी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज  :-हिंदवी स्वराज्याची निर्मीती करतांना छञपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातिल लोकांना सोबत घेवुन रयतेच्या हिताचे रक्षण केले.शिवाजी महाराजांची स्वराज्य संकल्पना धर्मनिरपेक्ष होती.असे प्रतिपादन माजी कैबिनेट मंञी तथा ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेञाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.          देसाईगंज तालुक्यातिल कुरुड येथे काल १८ फेब्रुवारी ला नवतरुण युवक मंडळाच्या वतिने बळीराजा चौकातिल सुभाष वार्डात शिव जयंती महोत्सव निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात शिवचरिञ प्रबोधनकार कांचनताई शेळके यांच्या शिवकिर्तन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विचार व्यक्त करतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की,देशात मोघलांनी सत्ता काबिज केल्यानंतर जुलमी राजसत्ता अस्तित्वात आली.या सत्तेत सर्वसामान्य जनतेवर अनेक कर आखुन मोघलांनी लुट मचवली होती. मोघलांवेतिरिक्त इतर धर्मियांना अपमानजनक वागणुक दिली जात होती.आपल्या मातित इतरांनी राज्य करणे हे जिजाऊंना मान्य न्हवते.यासाठी स्वराज्याचा पाया रचण्यासाठी जिजाऊंनी लहानवयातच शिवरायांवर स्वराज्य निर्मितिचे संस्कार रुजविले; स्वराज्याचा लढा उभारतांना शिवरायांनी जातिभेद व धर्मभेद ही संकल्पना स्पष्टपणे नाकारली. आपल्या सैन्यात सर्व जातिधर्मातिल मावळ्यांसह मुस्लिमांनाही मानाचे स्थान देवुन छञपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष पद्धतिने हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली.शिवरायांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी दांभिक सत्तेचे मनसुबे हानुण पाडा;असे आवाहनही कार्यक्रमाप्रसंगी वडेट्टीवारांनी केले.

कार्यक्रमाला माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,डॉ.नामदेव किरसान वामनराव सावसाकडे, परसराम टिकले,राजुभाऊ रासेकर,नितिन राऊत, मनोज ढोरे,नानाजी तुपट,हरिष मोटवानी,राजु बुल्ले, दिगांबर मेश्राम,प्रशाला गेडाम,संदिप वाघाडे,अरुण कुंभलवार,यांचेसह मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आयोजन मनोज ढोरे यांचा वडेट्टीवार यांचे हस्ते शाल व श्रिफळ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधुन घेण्यात आलेल्या  सामान्य ज्ञान परिक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्ध्यार्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रदिप उरकुडे, गणेश भोयर,संदिप प्रधान,पियुष उरकुडे,अनिल चिंचोळकर,आदित्य मिसार यांचेसह नवतरुण युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नक्षल चळवळीतील शेवटचा सक्रिय सर्वोच्च नेता मिसिर बेसरा याची झारखंडच्या सारंडा जंगलात अन्नावाचून कोंडी झाल्याने मोजक्या नक्षलवाद्यांसह जंगलात भटकत असतांनाच त्याच्या अंगरक्षकासह...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!