Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसोळावं वरीस धोक्याचे; अल्पवयीन मुलींची मानसिकता बदलणे गरजेचे..

सोळावं वरीस धोक्याचे; अल्पवयीन मुलींची मानसिकता बदलणे गरजेचे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काळ बदलत चाललाय.पूर्वी मुलीचे वडील मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघायला मुलाच्या घरी जायचे.मात्र,काळानुरूप बदल होऊन आता मुलाचे वडील वा कुटुंबीय लग्नासाठी मुलगी आहे काय? असेल तर आम्हाला याबाबत कळवाल काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक तरुण ‘अधुरी कहाणी लग्नाची’ म्हणत वयोवृध्द होऊ लागले आहेत.अशातच नव तारुण्यात पदार्पण करणाऱ्या अल्पवयीन मुली प्रेमाच्या आणाभाका घेत घरून पळून जातांना दिसून येतात.त्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याने काही मुली प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकतात,तर अनेक मुली घरच्यांच्या दबावाला घाबरून घर सोडतात.अल्पवयीन मुलींशी पालकांनी
योग्य संवाद साधणे अत्यावश्यक असते.त्यांचे मित्र-मैत्रिणी,इतर सहकारी यांची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे.एखादी गोष्ट खटकली तर त्यांना विश्वासात घेऊन विचारणे योग्य ठरते.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या वयात अनावश्यक दबाव टाकणे टाळले पाहिजे.प्रेमप्रकरण,पैशांची चिंता,घरात होणारे वाद,अभ्यास किंवा लग्नासाठी दबाव,नातेवाइकांशी झालेले भांडण,घरातील वातावरण,घरात होणारा छळ,आजारपणाचा त्रास,बाहेरील जगाचे आकर्षण व विसंवाद यांमुळे मानसिकता बदलून अनेकदा अल्पवयीन मुली,महिला-पुरुष घर सोडून स्वतःचे निर्णय घेत बेपत्ता होत असतात.सोळावं वरीस धोक्याचे जरी असले तरीही घरच्यांनी याकडे लक्ष घालून अल्पवयीन मुलींची मानसिकता बदलणे गरजेचे झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!