- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधातील विभागीय चौकशा आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.या चौकशीसाठी आवश्यक सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतानाच यात ऑनलाईन पद्धतीने ई-साक्ष नोंदविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
राज्यात विविध कारणास्तव सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विभागीय चौकशा लावल्या जातात.मात्र,तांत्रिक कारणे पुढे करत त्या लांबविण्याचा प्रयत्न केला जातो.या प्रकरणावर आळा घालत दिलेल्या वेळेत चौकशी पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेणे,व्हिडीओ कॉन्फरन्स सुनावणी घेत आरोप असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच सरकारी साक्षीदार यांची सरतपासणी व उलट तपासणी ई-साक्षमार्फत नोंदविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने अलीकडेच याबाबतचा शासन निर्णय अर्थात जीआर जारी केला आहे. त्यानुसार अप्पर मुख्य सचिव,प्रधान सचिव,सचिव आणि विभागीय चौकशी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागीय चौकशीची प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे.यात आरोप असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच सरकारी साक्षीदार ज्या जिल्ह्यात कार्यरत किंवा राहात असतील तिथे अथवा शेजारील जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय,संबंधित प्रशासकीय विभागाच्या अखत्यारीतील कार्यालये,जिल्हा मुख्यालयात उपस्थित राहून साक्ष नोंदवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
- Advertisement -

