Wednesday, September 2, 2026
Homeकोंढाळादलित वस्ती सुधार योजनेचा निधी दलित वस्त्यांवरच खर्ची घाला-शिशुपाल वालदे बौद्ध समाज...

दलित वस्ती सुधार योजनेचा निधी दलित वस्त्यांवरच खर्ची घाला-शिशुपाल वालदे बौद्ध समाज अध्यक्ष

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :-देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी इतरत्र खर्ची न घालता दलित वस्त्यांच्या विकासासाठी निधीचा योग्य प्रकारे वापर करून विकास कामे करावी.असे कोंढाळा येथील बौद्ध समाजाचे अध्यक्ष शिशुपाल वालदे यांनी ग्रामपंचायतींना ठणकावून सांगितले आहे.

दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद मार्फतीने दरवर्षी लाखो रुपयांचा निधी दलित वस्ती विकास कामासाठी दिला जातो.सदर योजने अंतर्गत दलित वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते,नाली बांधणे,पाणीपुरवठा,पाण्याचा हौद,समाजमंदिर, रस्त्यावरील विद्युत पुरवठा,सार्वजनिक शौचालये व इतर गरजा विचारात घेऊन विकास कामांकरिता निधीचा पुरवठा केला जातो.मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता देसाईगंज तालुक्यातील काही ग्रामपंचायती दलित वस्ती सुधार योजनेचा निधी दलित वस्त्यांच्या विकास कामावर खर्ची न घालता इतर कामांवर व इतरत्र निधी खर्च करीत असल्याचे दिसून येत आहे.गावकऱ्यांना कोणत्याकामासाठी किती निधी आला व सदर निधी कशासाठी वापरले जाणार आहे याची माहितीच नसते व ग्रामपंचायत पदाधिकारीही माहिती देत नसल्याने सामान्य नागरिकांची गळचेपी होत आहे असे शिशुपाल वालदे यांनी म्हटले.दलित वस्ती सुधार योजनेचा निधी इतरत्र वापर केले गेले असल्यास माहितीच्या अधिकारात देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतींची माहिती घेऊ व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करू असेही वालदे यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!