Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका होणार पेपरलेस...

आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका होणार पेपरलेस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ई-कॅबिनेट संकल्पना राबविण्याचे सूतोवाच केल्यानंतर त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू झाली आहे.यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.या ई-कॅबिनेटसाठी आवश्यक टॅबची हाताळणी आणि सॉफ्टवेअरबाबत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले. देशातील जवळपास पाच राज्यांत ई-कॅबिनेटची अंमलबजावणी करण्यात आली आहे.महाराष्ट्रातही लवकरात-लवकर ही संकल्पना राबविण्याचा फडणवीस सरकारचा मानस आहे.
पारदर्शक आणि गतिमान कारभारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याचा संकल्प फडणवीस यांनी सत्तेत येताच केला होता.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकाही ई-कॅबिनेटच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय नव्या वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.त्यादृष्टीने विविध विभागांतील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना ई-कॅबिनेटचे प्रशिक्षण देण्यात आले. लवकरच मंत्री कार्यालयातील अधिकारी आणि खुद्द मंत्र्यांनाही याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांसमोर ई-कॅबिनेटबाबत सादरीकरण करण्यात आले.राज्य सरकारचा कारभार अधिकाधिक डिजिटल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.राज्य मंत्रिमंडळाची बैठकच ई- कॅबिनेटवर आल्यास कारभार पेपरलेस करण्यास गती मिळणार आहे.विशेषतः,यामुळे मोठ्या प्रमाणावर कागदाची बचत होणार आहे.
ई-कॅबिनेटसाठी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना टॅब वितरित केले जाणार आहेत.या टॅबमध्ये संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रस्तावांचे टिपण आणि इतर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.या टॅबसाठी एक यूआयडी क्रमांकही दिला जाणार असल्याचे समजते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!