Sunday, August 2, 2026
Homeबीडअवैध वाळू उपसा प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह दोन तलाठी व एक शिपाई निलंबित...

अवैध वाळू उपसा प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह दोन तलाठी व एक शिपाई निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाळू माफिया राज सुरू असल्याचे चित्र आहे.काही अपवाद वगळता बऱ्यापैकी अधिकारी,कर्मचारी संगनमत करून अवैध वाळू उपशावर आळा न घालता सर्व दारे खुली असल्याचे भासवित आहेत.अशातच एक ना एक दिवस प्रकरण अंगलट येणारच याची प्रचिती हल्ली बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे.बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असतांना वाळू माफियांकडून महसूलच्या पथकावर हल्ला केल्याचा खोटा गुन्हा महसूल कर्मचाऱ्यांनी दाखल केला होता.त्यानुसार बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील वाळू घाटाची जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ५ जानेवारीला स्वतः पाहणी केली असता,तेथे मोठ्या प्रमाणात अवैद्यरित्या वाळू उत्खनन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.वाळूच्या उत्खननावर लक्ष ठेवणे ही मंडळ अधिकारी,तलाठी यांची प्राथमिक जबाबदारी असतांना त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यास अक्षम्य दिरंगाई केली.त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
दरम्यान,वाळू माफियांकडून याच महसूलच्या पथकावर हल्ला केल्याचा खोटा गुन्हा महसूल कर्मचाऱ्यांनी दाखल केला होता.या प्रकरणी चौकशी केली असता चौकशीत हा गुन्हा खोटा असल्याचं सिद्ध झाले.या प्रकारामुळे शासनाची प्रतिमा जनसामान्यात मलीन झाली आहे.अधिकाऱ्यांच्या गैर वर्तनाचे गांभीर्य विचारात घेवून जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या ४ कर्मचाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.जिल्हाधिकारी पाठक यांनी गेवराई तालुक्यातील रेवकीचे मंडळ अधिकारी पकाले बाळासाहेब हरिदास,रेवकी साजाचे तलाठी गोविंद प्रभाकर नरवटे,आगरनांदूरचे तलाठी गणेश तुळशीराम बावसकर आणि गेवराई तहसील कार्यालयातील शिपाई विठ्ठल रामराव सुतार असे तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.तसेच त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश काढले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूर ओसरला; प्रशासनाकडून घराघरांत जाऊन पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन दिवसांत  झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा आणि पामुलागौतम नदीला मोठा पूर आला होता.परिस्थिती आता सामान्य असून पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने...

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात चीमुकल्यांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार,महाराष्ट्र राज्यात बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण...

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!