Sunday, August 2, 2026
Homeगडचिरोलीघरकुल योजनेत प्रशासनाचे दुटप्पी धोरणा; लाभार्थी चिंताग्रस्त..

घरकुल योजनेत प्रशासनाचे दुटप्पी धोरणा; लाभार्थी चिंताग्रस्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पंतप्रधान आवास योजना,यशवंतराव घरकुल योजना, रमाई आवास,मोदी आवास योजना अशा विविध योजना शासनाकडून राबविल्या जात आहेत.मात्र, घरकुल योजना राबवितांना प्रशासनाने दुटप्पी धोरणाचा अवलंब करीत ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग पाडून घरकुल निधीत मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण केली आहे.त्यामुळे घरकुल कसे बांधावे,असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
ग्रामीण भागातील घरकूल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाकडून १ लाख ३० हजार आणि प्रोत्साहन अनुदान १८ हजार असे एकूण १ लाख ४८ हजार रुपयाचा निधी दिला जातो.शहरी भागात २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.ग्रामीण आणि शहरी भागातील घरकुल निधीतील मोठी तफावत आणि भेदभाव दूर करण्याऐवजी उलट पीएम आवास
निधीमधील १० हजार रुपये कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने गरीब घरकूल लाभार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.नवीन धोरणांनुसार आता १ लाख ३८ हजार रुपयेच मिळणार असून तुटपुंज्या निधीत आपल्या घराचे स्वप्न कसे पूर्ण करायचे,असा प्रश्न निर्माण झाला आहे.परंतु अजूनपर्यंत ग्रामीण आणि शहरी घरकुल निधीच्या तफावतीबद्दल कुणीच आवाज उठवत नसल्याचे  दिसून येत आहे.गरीब जनता घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव असूनही चिंताग्रस्त आहेत.घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडले आहे. मात्र,शासनाने ग्रामीण आणि शहरी भागातील घरकुल निधीतील तफावत व निधी कपातीचा घेतलेला निर्णय घरकुल लाभार्थ्यांस कर्जबाजारी बनवणार आहे.त्यामुळे एकसारखा आणि घरकुलांच्या रकमेतही वाढ करण्याची मागणी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूर ओसरला; प्रशासनाकडून घराघरांत जाऊन पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन दिवसांत  झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा आणि पामुलागौतम नदीला मोठा पूर आला होता.परिस्थिती आता सामान्य असून पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने...

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात चीमुकल्यांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार,महाराष्ट्र राज्यात बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण...

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!