Tuesday, August 25, 2026
Homeमुंबईसंजय राऊतांना धमकीचा फोन; तुमचाही तसाच करू..

संजय राऊतांना धमकीचा फोन; तुमचाही तसाच करू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रक न्युज वृत्त 

मुंबई :- रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारिसे  यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. सोमवारी मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर येथे शशिकांत वारिसे यांच्या गाडीला धडक दिल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान,अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी पंढरीनाथ आंबेरकर यांच्या थार गाडीने वारिसे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. शशिकांत वारिसे यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात बातमी प्रसिध्द केल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.या प्रकरणावरुन आता राज्यातील पत्रकारांसह राजकीय नेतेही आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेकेड लक्ष वेधले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. मलाही तुमचा शशिकांत वारिशे करु असा धमकी देणारा फोन आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.”मलाही आज दोनदा फोन येऊन गेला की हा मुद्दा तुम्ही उचलू नका. तुमचाही मुंबईत शशिकांत वारीशे करु अशी दोनदा फोनवरुन मला धमकी देण्यात आली. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही मी कोकणात जाणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!