Saturday, May 2, 2026
Homeमुंबईसंजय राऊतांना धमकीचा फोन; तुमचाही तसाच करू..

संजय राऊतांना धमकीचा फोन; तुमचाही तसाच करू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रक न्युज वृत्त 

मुंबई :- रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारिसे  यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. सोमवारी मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर येथे शशिकांत वारिसे यांच्या गाडीला धडक दिल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान,अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी पंढरीनाथ आंबेरकर यांच्या थार गाडीने वारिसे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. शशिकांत वारिसे यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात बातमी प्रसिध्द केल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.या प्रकरणावरुन आता राज्यातील पत्रकारांसह राजकीय नेतेही आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेकेड लक्ष वेधले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. मलाही तुमचा शशिकांत वारिशे करु असा धमकी देणारा फोन आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.”मलाही आज दोनदा फोन येऊन गेला की हा मुद्दा तुम्ही उचलू नका. तुमचाही मुंबईत शशिकांत वारीशे करु अशी दोनदा फोनवरुन मला धमकी देण्यात आली. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही मी कोकणात जाणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!