Thursday, August 6, 2026
Homeनवी दिल्लीनाते तोडली किंवा लग्नाचे आमिष दाखवून दिलेले वचन मोडले तर कुणाला दोषी...

नाते तोडली किंवा लग्नाचे आमिष दाखवून दिलेले वचन मोडले तर कुणाला दोषी मानता येणार नाही-सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-भावनिकरित्या अस्वस्थ झालेल्या एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर त्यासाठी इतर कुणाला दोषी मानता येणार नाही.नाते तोडली किंवा लग्नाचे आमिष दाखवून दिलेले वचन मोडले तर अशी व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त करीत आहे; असे म्हणणे चुकीचे असल्याचे आज,शुक्रवारी २९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे.
दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने,कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला.ज्यामध्ये आरोपी कमरुद्दीन दस्तगीर सनदीला त्याच्या मैत्रिणीसोबत आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.हा खटला फौजदारी खटला मानण्याऐवजी त्यांनी सामान्य ब्रेकअप केस मानून शिक्षा रद्द केली आहे. मात्र,न्यायालयापूर्वी ट्रायल कोर्टानेही आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती.
 
काय आहे प्रकरण👇
 
२००७ मध्ये आरोपी कमरुद्दीनने ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता.यानंतर २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती.त्यानंतर तिच्या आईने तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.ट्रायल कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली,परंतु उच्च न्यायालयाने त्याला कलम ४१७ (फसवणूक) आणि कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत दोषी ठरवले आणि त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.आरोपीचे मुलीसोबत शारीरिक संबंध असल्याचे तपासात सिद्ध होऊ शकले नाही; असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.तसेच,आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही खरा ठरला नाही; अशा परिस्थितीत मुलाला शिक्षा करणे योग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करीत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!