- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ‘ई- केवायसी’ करणे बंधनकारक आहे.शिधापत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोंबर वरून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
बँकेचे खाते असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो,प्रत्येक ठिकाणी ई-केवायसी बंधनकारक आहे.त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डसाठीही ई-केवायसी बंधनकारक आहे.बोगस लाभार्थी शोधून काढण्याच्या उद्देशाने ई-केवायसी महत्त्वाची ठरत आहे.मात्र,पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये; यासाठी शासनाकडून सातत्याने ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली जात आहे.आता रेशनकार्ड व लाभार्थ्यांच्या ई केवायसीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वेळेत ई-केवायसी करावे; असे आवाहन करण्यात आले आहे.फोर-जी ई-पॉस मशीनद्वारे ई-केवायसी रेशनकार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल,तर परिसरातील स्वस्त धान्य दुकानातील फोर-जी ई-पॉस मशिनद्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा दिली आहे.लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक टाकल्यानंतर लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.पांढऱ्या व पिवळ्या रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती.त्यात सर्व संग्रहीत छायाचित्र रेशनकार्डधारकांनी ई-केवायसी करणे अनिवार्य होते.त्यासाठी आता शेवटची तारीख ३१ डिसेंबर करण्यात आली आहे.आतापर्यंत दोनवेळा ई-केवासयी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.
- Advertisement -

