Monday, September 7, 2026
Homeपुणेघराबाहेर चाबी लपवून ठेवता; जरा जपून.. चोरट्यांची नजर चाबिवर....- चोरट्यांनी ९७ हजाराची...

घराबाहेर चाबी लपवून ठेवता; जरा जपून.. चोरट्यांची नजर चाबिवर….- चोरट्यांनी ९७ हजाराची केली चोरी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

पुणे :- घराबाहेर जाताना कुलूप लावून सवयीप्रमाणे दाराबाहेर लपवून ठेवलेल्या चावीचा वापर करूनच चोरट्यांनी घरातील ९७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नारायण पेठेत घडली. ही घटना भर दिवसा दुपारी बारा ते एक वाजताच्या सुमारास घडल्याने परिसरात भर दिवसा झालेल्या चोरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

नारायण पेठेत मोदी गणपती मंदिराजवळ वैष्णवी अपार्टमेंटमध्ये चार फेब्रुवारीला भरदिवसा चोरी करून ९७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरण्यात आला. सदर प्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वैष्णवी अपार्टमेंट येथे राहतात.त्या चार फेब्रुवारीला घराच्या दरवाजाला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेल्या होत्या.त्या वेळी जाताना त्यांनी घराबाहेरील गादीखाली चावी ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी गादीखाली ठेवलेली त्यांची चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला.त्यानंतर घरात प्रवेश करून लोखंडी कपाट आणि कपाटातील ड्रॉवर तोडून त्यातील ३५ हजार रुपयांची रोकड, ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पाचशे रुपये किमतीचे चांदीचे तोडे, असा ऐवज चोरून नेला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!